वडगाव मावळ :- लोणावळा ते पुणे लोकल ही पुणे-मुंबई मार्गावर राहणान्या हजारों लोकासाठी दररोजची जीवनवाहिनी आहे. परंतु सध्या या मार्गावरील लोकल गाड्यांचे वेळापत्रक सध्या पुरते कोलमडलेले दिसून येत आहे. या प्रकारामुळे हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वकडून पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे अशा लोकलच्या फेन्या सोडण्यात येतात. रेल्वेकडून जे वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे, त्यानुसार साधारणतः दर अर्ध्या ते पाऊण तासाने लोकल सुटणे अपेक्षित आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुढे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात या लोकलला थांबे देण्यात आलेले आहेत.
पुणे-मुंबई मार्गावर राहणारे हजारो नागरिक दररोज या लोकल ट्रेनने पुपी ते लोणावळा व लोणावळा ते पुणे असा प्रवास करीत असतात. यानुसार पाहायला गेलो तर ही लोकल या परिसरातील नागरिकांसाठी एक जीवनदायिनीच म्हणावी लागेल, अत्यंत सुलभ, स्वस्त आणि सुकर असल्या कारणाने या लोकलने मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या लोकलचे वेळापत्रक पुरते कोलमडल्याचे दिसत आहे. लोकल गाड्या वेळेवर न येणे, वेळेवर न सुटणे, अनेक ठिकाणी वेळेपेक्षा जास्त स्टॉपेज घेणे, दोन गाड्यांमध्ये ठरवून दिल्यापेक्षा दोन ते तीन तासाचा कालावधी असणे, असे प्रकार नित्याचेच झालेले आहेत.
या प्रकारामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा शाळा-कॉलेजला मुकावे लागते. अनेक व्यापान्यांनाही वेळापत्रक कोलमडल्याचा याचा फटका बसतो आहे.
कोरोना महामारीच्या काळात रेलवे विभागकडून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु त्या वेळी प्रवाशांची संख्या खूपच कमी असल्याने त्याचा काही त्रास झाला नाही. आता कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. तरीही रेलवे विभाग मात्र लोकल फेल्यांवरील निर्बंध उठवत नसल्यानेच या फेन्यामध्ये मोठा अवकाश राहतो, त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.
शैलेश बोथरा (नियमित प्रवासी) या मार्गाने प्रवास करणारे शैलेश बोथरा यांनी सांगितले की, हा नेहमीचाच त्रास आहे. तासन् तास पुणे-लोणावळा रेलवेसाठी आम्हाला वाट पहावी लागते. या प्रकारामुळे आमची कामे खोळवत आहेत. विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेलवे विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, अधिकारी योग्य उत्तर देत नाहीत. अधिकारी आम्हाला वरिष्ठांना ट्वीट करण्याचे सलने देतात. रेलवे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया बोथरा यांनी दिली.

