भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेला. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 119 धावांनी (DLS Method) पराभव करत भारताने 3-0 ने मालिका खिशात घातली. शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे शुभमन गिलच्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. शुभमन गिलच्या नाबाद 98 धावांच्या जोरावर भारताने 36 षटकांत 225 धावा केल्या.
शुभमन गिलच्या पहिल्या वहिल्या शतकात पावसाचा खोडा
वेस्ट इंडिजला पावसामुळे DLS Method नुसार 35 षटकांत विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य मिळाले. धावसंख्येचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 137 धावांत गारद झाला. भारताकडून युझवेंद्र चहलने चार, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. शुभमन गिलने 98 चेंडूत दोन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने नाबाद 98 धावांची खेळी केली. त्याने कर्णधार शिखर धवन (58) सोबत पहिल्या विकेटसाठी 113 आणि दुसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर (44) सोबत 86 धावांची भागीदारी केली. सामनावीर व्यतिरिक्त त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
